Skip to main content

CELEBRATION OF MARATHI BHASHA DIWAS 2019 - Part 1

27 February is the birthday of Dnyanpeeth Award-winning author, playwright V. Shirewadkar alias Kavi Kusumagraj This day is celebrated worldwide as 'World Marathi Language Day'. Worshiping Kusumagraj, whose stylus has made a distinct impression in the literature of the country and the world!


Image result for marathi bhasha diwas

कुसुमाग्रज
वि.वा. शिरवाडकर यांचे खरे नांव गजानन रंगनाथ शिरवाडकर दत्तक गेल्यामुळे त्यांचे नांव विष्णु वामन शिरवाडकर झाले. २७ फेब्रुवारी १९१२ साली त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण पिपंळगाव येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण नाशिक येथील न्यू इंग्लीश स्कुलमध्ये म्हणजे आजचे जे जु. स. रुंगठा विद्यालय आहे तेथे झाले. मॅट्रिक परिक्षा ते मुंबई विद्यापीठातून पास झाले.
kusumagraj
१९३० साली हं. प्रा. ठाकरसी विद्यालयात ते होते तेव्हा 'रत्नाकर' मासिकातुन त्यांच्या कविता प्रसिध्द होत. अस्पृश्य समजल्या जाणार्‍या लोकांना काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून १९३२ साली जो सत्याग्रह झाला त्यात त्यांनी सहभाग घेतला होता, त्यामूळे बाल्यावस्थेतील त्यांच्या लिखाणाला प्रौढत्वाची लकाकी चढून हळूहळू त्यांच्या साहित्याने आकाशाला गवसणीच घातली. ज्यात त्यांनी फक्त कविताच नाही तर कथा, कादंबर्‍या, नाटके, ललित साहित्य याबरोबर प्रभा साप्ताहिक, प्रभात वृत्तपत्र, सारथी, धनुर्धारी व नवयुग यामध्ये पत्रकारिता पण केली. त्यांचा आवडता लेखक पी. जी. वुडहाऊस व आवडता नट चार्ली चाप्लिन होता.
१९४२ साली प्रसिध्द झालेला 'विशाखा' हा काव्यसंग्रह म्हणजे मराठी वाङमयातील उच्च कोटीचे वैभव होय. जे आजही मराठी साहित्यप्रेमींना भुरळ घालते. 'मराठी माती', 'स्वागत', 'हिमरेषा' यांचबरोबर 'ययाती आणि देवयानी' व 'वीज म्हणाली धरतीला' ही नाटके १९६० ते १९६६ साली प्रसिध्द झाली. सार्‍या साहित्य कृतींना राज्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. १९४६ साली 'वैष्णव' ही कादंबरी व 'दूरचे दिवे' हे नाटक प्रसिध्द झाले.
'नटसम्राट' ही त्यांच्या लेखणीतून उतरलेली सर्वोत्कृष्ट कलाकृती तर होतीच पण त्याचे नाटयप्रयोगही खूप गाजले. नाटयवेडया मराठी रसिकांनी त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले. अत्यंत नाजुक व भावुक विषयाला हाताळणारे हे नाटक वयोवृध्दांचा दृष्टीकोन बदलणारे ठरले कारण अनेक वृध्दांनी हे नाटक पाहिल्यावर आपले मृत्यूपत्र बदलले. तरूणांचाही वृध्दांकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलला.
कुसुमाग्रज एक वेगळं व्यक्तिमत्व 
त्यांच्या साहित्य प्रवासाबरोबर माणूस म्हणून त्याचं वेगळं व्यक्तिमत्व अभ्यासायचं तर अनेक पैलूनी ते पहावे लागेल. नाशिकमधील अनेक चळवळींचे ते प्रणेते होते. उदाहरणार्थ, त्यांनी लोकहितवादी मंडळ १९५० मध्ये सुरू केले. नाशिकच्या प्रसिध्द सार्वजनिक वाचनालयाचे ते १९६२ ते १९७२ पर्यंत अध्यक्ष होते. ते दशक वाचनालयाचे सुवर्णयुग म्हटले पाहीजे. सामाजिक वा वैयक्तिक अशा कुठल्याही प्रकल्पांना ते मार्गदर्शन करीत. कोणीही कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन मागण्यास आला तर क्षणात त्या व्यक्तीची क्षमता ओळखून ते मदत करीत. असं असूनही यश साजरं करतांना ते मागे राहणंच पसंत करत.
साहित्यसूर्य मावळला 
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात कुसुमाग्रजांच्या निधनाने जी पोकळी निर्माण झाली ती कधीच भरून निघणार नाही. नाशिककरांना तर आपल्या घरातील वडीलधारं माणूस गमावल्याचं दु:ख आहे. मानवतेचा कळवळा व मराठी भाषेवरचं प्रभुत्व यामुळेच 'नटसम्राट' व 'विशाखा' सारखे साहित्य जन्माला आले. एवढं उत्तुंग कर्तृत्व व अनेक पुरस्कारांनी सन्मानित व्यक्तिमत्व अत्यंत साधे तर होतेच पण शेवटपर्यंत अत्यंत नम्र व सत्कार्याला वाहून घेतलेले जीवन ते शेवटपर्यंत जगले. शिक्षणक्षेत्रात त्यांनी खूप मार्गदर्शन केले. आजची परीक्षा पध्दती मुलांसाठी निष्ठुर पध्दती आहे असे त्यांचे मत होते. इतरही अनेक क्षेत्रात त्यांनी लोकांना योग्य मार्ग दाखवले. त्यांचे घर म्हणजे तीर्थक्षेत्र झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्थापण्यात आलेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानाचे समाजातील गरीब, गरजू व मागासलेल्या जनतेसाठी योगदान वाखाणण्यासारखे आहे.

Source: http://www.kusumagraj.org/kusumagraj/parichay.php (Accessed on February 28, 2019)

Comments

Popular posts from this blog

🏛️ ICSSR-NSTC (Taiwan) Joint Call for Research Proposals 2026

  Bilateral Collaborative Research in Social Sciences & Humanities An initiative to strengthen academic cooperation between India and Taiwan by supporting joint, high-quality research projects on new and emerging mutual themes. 📅 Key Timelines & Important Dates Application Opens: June 01, 2026 Application Deadline: August 03, 2026 Completion of Peer-Review: October 14, 2026 Result Announcement: December 2026 Project Commencement: January 01, 2027 Project End Date: December 31, 2028 (2-Year Duration) 💰 Funding & Grant Breakdown Total Supported Projects: Maximum of 5 joint research projects. Maximum Funding Limit: Up to ₹12,00,000 (Twelve Lakh INR) per project. Primary Expense Intent: Mobility of researchers (travel, lodging, and ground hospitality). Travel Split: The visiting side bears international & domestic inter-city air travel. The receiving side bears boarding, local lodging, and ground transportation expenses. 🔬 Core Supported Themes & Disciplines Prop...

Marathi Bhasha Diwas 2025 Competitions

 🎉 Celebrate Marathi Bhasha Diwas with Your Creativity! 🎉 In honor of Marathi Bhasha Diwas on 27th February, the Learning and Information Resource Centre (Library) invites all students and staff to participate in a Poetry and Short Story Competition. ✍️📚 This is your chance to showcase your talent and celebrate the rich heritage of the Marathi language! 🇮🇳✨ Themes: 📝 Poetry: माझी मातृभूमी 📖 Short Story: Theme Cards are available in the library. Submission Guidelines: ✒️ Poetry: Max. 30 lines 📜 Short Story: Max. 1000 words 🗣️ Language: Marathi only ⏰ Deadline: 20th February 2025 🎁 The best entries will be featured in the College Annual Magazine 📖 and shared on our social media platforms 📲. Winners will also receive certificates to celebrate their creativity! 🏆 Submit your entries at the Library or via email at: 📧 sfitlibrary@sfit.ac.in Don’t miss out on this amazing opportunity to be part of this special celebration of Marathi! 🌟💬

e PG Pathshala: A Gateway to all Post Graduate Courses

1.What is e-PGPathshala? e-PGPathshala is a one portal under which High quality, curriculum-based,interactive content in different subjects across all disciplines of social sciences, arts, fine arts & humanities, natural & mathematical sciences, linguistics and languages is being developed.An MHRD, under its National Mission on Education through ICT (NME-ICT), has assigned work to the UGC for development of e-content in 77 subjects at postgraduate level. The content and its quality is the key component of education system. 2.Terminology in e-PGp and MOOCs 3.What is difference between e-PG Pathshala and SWAYAM? e-PG Pathshala provides e-content for post-graduate courses in various subjects in four quadrant. It can be accessed as Open Educational Resource where no teacher support/hand-holding for students is available. SWAYAM is a web platform on which MOOCs shall be hosted. These MOOCs shall have teacher-student groups where MOOC coordinator/tutor/tea...